Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

स्मृतिचित्रे (लक्ष्मीबाई टिळक) – पुस्तकाचे मुखपृष्ठ

स्मृतिचित्रे (लक्ष्मीबाई टिळक)

पेपरबॅक
आवृत्ती ७
  • लेखक : लक्ष्मीबाई टिळक
  • प्रकाशन : वरदा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४५८
  • किंमत : ₹४००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे. 'स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल.हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते.आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. ·कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते.आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.आचार्य अत्र्यांनी लक्ष्मीबाईंना साहित्यलक्ष्मी अशी पदवी दिली ती किती यथार्थ होती हे या पुस्तकावरून कळेल. कितीही कालावधी लोटला तरी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांचे अनन्यसाधारण माधुर्य आणि महत्त्व मराठी रसिकांच्या दृष्टीने अबाधित राहिले आहे. जोपर्यंत मराठी भाषा या पृथ्वीवर आहे तोपर्यंत हे चरित्र घरोघर वाचले जाईल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके