Logo
Logo
Hero
"अमृतातेही पैजा जिंके" असं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले आहे, ती आपली मराठी भाषा म्हणजे अनेक साहित्यालंकारांनी सजलेली समृद्ध खाण आहे. साहित्याच्या विविध प्रकारांत आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने सतत भर घालणारे सरस्वतीपुत्र जितके मराठीला लाभले, तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील. अशा या समृद्ध मराठीचा वसा आणि वारसा जगासमोर मांडणारे आपले व्यासपीठ म्हणजे, मराठी साहित्यसृष्टी!
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन

'मौज' प्रकाशनाचे निवृत्त संपादक आणि प्रतिभावान ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी तथा श्रीवि (वय ९०) यांचे गुरुवारी कराड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुले आलोक व उदयन; तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

कराड येथे २००२मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. गेले काही दिवस ते आजारी होते. दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. कोयना वसाहत भागातील घरीच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कराडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहा महिन्यांपूर्वीच त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे 'श्रीविं'चे मूळ गाव. कुलकर्णी यांनी बालवयापासून कवितालेखन सुरू केले. त्यांनी पहिली कविता चौथीत असताना लिहिली. ती पां. ना. मिसाळ यांच्या 'बालसन्मित्र' मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांची पहिली गोष्ट का. रा. पालवणकर यांच्या 'खेळगडी'च्या शेवटच्या बाललेखनात प्रसिद्ध झाली होती.

मराठी साहित्यविश्वात आपले स्वागत आहे​

लोड करत आहे...

लोड करत आहे...

लोड करत आहे...

लोड करत आहे...

लोकप्रिय पुस्तके

मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि साहित्यसंवर्धनाकरता सुरू असेलल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती

ताज्या घडामोडी

नवी कोरी पुस्तके