"अमृतातेही पैजा जिंके" असं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले आहे, ती आपली मराठी भाषा म्हणजे अनेक साहित्यालंकाराने सजलेली समृद्ध खाण आहे. साहित्याच्या विविध प्रकारात आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने सतत भर घालणारे सरस्वतीपुत्र जितके मराठीला लाभले, तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील.अशा या समृद्ध मराठीचा वसा आणि वारसा जगासमोर मांडणारे आपले व्यासपीठ म्हणजे, मराठी साहित्यसृष्टी!
या साहित्याची जननी असलेल्या मराठीला अगदी संतांपासून ते आत्ताच्या नवलेखकांपर्यंत मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांच्या प्रदीर्घ वाचकपरंपरेनेही समृद्ध केलं आहे. मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्याला वाचक, रसिकांपर्यंत पोहचवण्याकरता मराठी साहित्यसृष्टी या संकेतस्थळाची व अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे.आतापर्यंतच्या सर्व मराठी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या समग्र मराठी साहित्याबाबतची अद्ययावत माहिती डिजिटल स्वरुपात, अगदी एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे 'मराठी साहित्यसृष्टी' हे मराठी साहित्यविश्वातील एक अग्रगण्य पोर्टल आहे. वाचकांना आवडलेली पुस्तके थेट प्रकाशकांच्या संकेतस्थळांवरून पुस्तक खरेदीची सोय वाचकांना उपलब्ध होणार आहे.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे.
मराठी साहित्यविश्वात आपले स्वागत आहे
मराठी साहित्य व्यवहाराबद्दल सर्वंकष माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या या डिजिटल पोर्टलवर मराठी पुस्तक, लेखक, प्रकाशक, विविध ग्रंथालये यांसोबत भाषिक सेवा, मुखपृष्ठ चित्रकार, मराठी भाषा व साहित्यप्रेमी यांबद्दलचा अमूल्य ठेवा उपलब्ध आहे.

मान्यवरांची शिफारस
प्रदीप चंपानेरकर
- धर्मरेषा ओलांडताना... / हीना कौसर खान
- मनसमझावन / संग्राम गायकवाड
- रुह / मानव कौल (अनु. नीता कुलकर्णी)
- मंत्र / विनायक बंध्योपाध्याय (अनु. सुमती जोशी)
- काही आत्मिक, काही सामाजिक / सानिया

आजची कविता
मराठी साहित्यात कवितेची दीर्घ परंपरा राहिली आहे. मराठी साहित्यविश्वातील कवितांचा हा खास खजिना वाचकांसाठी.

पुस्तक परीक्षण/ओळख

ताज्या घडामोडी

९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात
तब्बल ३२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान यंदा साताऱ्याला मिळाला आहे. ९९ वे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे संपन्न झाली. त्यात साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले.
लोकप्रिय पुस्तके
मराठी साहित्यविषयातील संक्षिप्त माहिती
सन १९००मधील वाचन या विषयावरचे पुस्तक
सन १९०० मध्ये कोल्हापुरातून प्रकाशित होणाऱ्या 'ग्रंथमाला' मासिकात प्रकाशित झालेला सुमारे ८० पृष्ठांचा निबंध त्या मासिकाचे संपादक वि.गो. विजापूरकर यांनी नंतर पुस्तक रूपात प्रकाशित केला होता. त्याचे लेखक यादव शंकर बावीकर होते. त्याची किंमत १० आणे होती. पुस्तकाचे नाव 'वाचन’होते.
मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली.
मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि साहित्यसंवर्धनाकरता सुरू असेलल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती
लोड करत आहे...